Sunday, December 2, 2012

वर्तूळ

प्रत्येक माणूस स्वतः भोवती एक वर्तूळ आखून घेत असतो... 
या  वर्तुळाच्या कक्षेच्या आतील जागा फक्त त्याची स्वतःची असते ....
या जागेवर त्याच्या जन्मदात्या आईचा अथवा विश्वाची निर्मिती करणाऱ्या विधात्याचाही अधिकार नसतो...
मुले, बायको, मित्र यांचा तर नाहीच नाही....!
.
पण
कधी कधी काही नाती एवढी प्रगल्भ होतात...
माणसे एकमेकांच्या एवढी जवळ येतात ...
नात्यांमधील ओलावा एवढा वाढतो की वाटायला लागते -
'आपण समोरच्याला पूर्ण ओळखले आहे, आता त्याच्याबद्दल जाणून घ्यावे असे काहीच उरले नाही'...
समोरच्याचे वर्तूळ आपण भेदले आहे असेच वाटत राहते ...
.
इथेच खरी गल्लत होते...
माणूस चुकतो....
.
खरे तर ते वर्तूळ त्याने भेदलेले नसतेच ...
मनाची घातलेली ती एक समजूत असते ...
अथवा
त्या ओलाव्याला, जवळीकेला, प्रगल्भतेला दिलेली दाद असते... असे म्हणूया हवं तर..!
वर्तूळ भेदल्याचा तो केवळ एक भास असतो.
.
ह्या भासाचा परिणाम म्हणजेच 'गैरसमज'
आणि याचे टोकाचे स्वरूप म्हणजेच 'विश्वासघात'...
.
आणि
यातून बाहेर येण्याचा एकच मार्ग म्हणजे
'कुठलाही माणूस, कधीही, कसाही वागू शकतो, मग तो कितीही जवळचा असला तरीही ... रक्ताने आणि मनाने सुद्धा !'   
यावर प्रचंड विश्वास ठेवणे,
समोरच्याने आखलेल्या 'त्या' वर्तुळाचा प्रचंड आदर करणे
आणि ते वर्तूळ आपल्याला कधीच कळणार नाही
या 'व्यवहार्य' समजात कायम राहणे...!

No comments:

Post a Comment