माणसाचे यश हे अनेक गोष्टींसोबत नशिबावर अवलंबून असते, असे अनेकजण म्हणतात.
कोणाचे नशीब जास्त चांगले तर कोणाचे जास्त वाईट असेही तर्कवितर्क चालू असतात.
मला समजलेला नशिबाचा अर्थ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.---
मला कळलेल्या माणसाच्या काही मर्यादा अशा -
१. माणूस वेळेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो केवळ त्याच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकतो.
२. माणसाच्या मनात कोणते विचार येतील यावर त्याचे नियंत्रण नसते. मनात आलेल्या विचारांवर तो केवळ प्रक्रिया करू शकतो.
३. माणसाने केलेल्या कृतीचा नेमका काय परिणाम होईल अथवा काय फळ मिळेल यावरही त्याचे नियंत्रण नसते.
४. माणसाला सत्याचा ध्यास आहे पण सत्याच्या अनुभूतीपासून त्याला कायम वंचित रहावे लागते.
आणि गंमत अशी आहे की,
या मर्यादा जरी अमान्य केल्या तरीही, एक गोष्ट मान्य करावी लागेल की -
'प्रत्येक माणसाला वेळ, विचार, कृतीचे फळ आणि सत्याची अनुभूती यांची समान संधी निसर्गतः उपलब्ध असते.'.
वेळ सर्वांकडे २४ तासच आहे...
विचार निर्माण होण्याची प्रक्रिया सदोदित सुरुच असते .... सर्वांमध्ये सारख्याच वेगाने
फळाची समान संधी सर्वांकडे आहे ...
सत्याची ओढ सर्वांमध्ये तेवढीच आहे.... अगदी खोटे बोलणाऱ्या मध्येही !
पण ही समान संधी , माणसाला ज्ञानाअभावी कळत नाही वा कर्तृत्वाअभावी फलद्रूप करता येत नाही.
निसर्गाने (निर्मिकाने ) या गोष्टी मानवाला देताना अन्याय केला नाही ... समभाव ठेवला.
या मर्यादांमुळेच माणसाचे यशही मर्यादीत राहिले आहे...
यालाच त्याने नशीब म्हटले....
नशीब म्हणजेच माणसाला न उनगडलेल्या, वर उल्लेखलेल्या या चार मर्यादांचा एकत्रित परिणाम होय...!
समान संधीचा अर्थ आपण असाही लावू शकतो कि... सर्वांचे नशीब सारखेच असते ...
भिन्न असतात त्या दिशा, प्रयत्न, नियंत्रण आणि सत्य शोधकता. हीच भिन्नता प्रत्येकाचे यश भिन्न करते .
प्रत्येकाचे नशीब सारखेच असते .
अमर्याद यश आणि अमर्याद अपयश यांपासून माणसाला वंचित ठेवण्यासाठी 'नशीब' या संकल्पनेचा प्रभावशाली उपयोग निर्मिकाने केला असावा असे मला वाटते... संतुलन साधण्याचा त्याचा हाही एक मार्ग असावा, कदाचित !
..... यम
कोणाचे नशीब जास्त चांगले तर कोणाचे जास्त वाईट असेही तर्कवितर्क चालू असतात.
मला समजलेला नशिबाचा अर्थ मी इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.---
मला कळलेल्या माणसाच्या काही मर्यादा अशा -
१. माणूस वेळेवर नियंत्रण ठेवू शकत नाही, तो केवळ त्याच्या कृतीवर नियंत्रण ठेवू शकतो.
२. माणसाच्या मनात कोणते विचार येतील यावर त्याचे नियंत्रण नसते. मनात आलेल्या विचारांवर तो केवळ प्रक्रिया करू शकतो.
३. माणसाने केलेल्या कृतीचा नेमका काय परिणाम होईल अथवा काय फळ मिळेल यावरही त्याचे नियंत्रण नसते.
४. माणसाला सत्याचा ध्यास आहे पण सत्याच्या अनुभूतीपासून त्याला कायम वंचित रहावे लागते.
आणि गंमत अशी आहे की,
या मर्यादा जरी अमान्य केल्या तरीही, एक गोष्ट मान्य करावी लागेल की -
'प्रत्येक माणसाला वेळ, विचार, कृतीचे फळ आणि सत्याची अनुभूती यांची समान संधी निसर्गतः उपलब्ध असते.'.
वेळ सर्वांकडे २४ तासच आहे...
विचार निर्माण होण्याची प्रक्रिया सदोदित सुरुच असते .... सर्वांमध्ये सारख्याच वेगाने
फळाची समान संधी सर्वांकडे आहे ...
सत्याची ओढ सर्वांमध्ये तेवढीच आहे.... अगदी खोटे बोलणाऱ्या मध्येही !
पण ही समान संधी , माणसाला ज्ञानाअभावी कळत नाही वा कर्तृत्वाअभावी फलद्रूप करता येत नाही.
निसर्गाने (निर्मिकाने ) या गोष्टी मानवाला देताना अन्याय केला नाही ... समभाव ठेवला.
या मर्यादांमुळेच माणसाचे यशही मर्यादीत राहिले आहे...
यालाच त्याने नशीब म्हटले....
नशीब म्हणजेच माणसाला न उनगडलेल्या, वर उल्लेखलेल्या या चार मर्यादांचा एकत्रित परिणाम होय...!
समान संधीचा अर्थ आपण असाही लावू शकतो कि... सर्वांचे नशीब सारखेच असते ...
भिन्न असतात त्या दिशा, प्रयत्न, नियंत्रण आणि सत्य शोधकता. हीच भिन्नता प्रत्येकाचे यश भिन्न करते .
प्रत्येकाचे नशीब सारखेच असते .
अमर्याद यश आणि अमर्याद अपयश यांपासून माणसाला वंचित ठेवण्यासाठी 'नशीब' या संकल्पनेचा प्रभावशाली उपयोग निर्मिकाने केला असावा असे मला वाटते... संतुलन साधण्याचा त्याचा हाही एक मार्ग असावा, कदाचित !
..... यम
No comments:
Post a Comment